आपला इतिहास जिवंत करा
गडवाट… प्रवास सह्याद्रीचा
गडवाट… प्रवास सह्याद्रीचा
फेसबुकच्या माध्यमातून गडवाट भटकंतीची एकत्र आलेला एक फेसबुक ग्रुप पुढे जाऊन आजमितीस एक सामाजिक संस्था म्हणून नावारूपाला आला. फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन तयार झालेली गडवाट… प्रवास सह्याद्रीचा ही संस्था आपल्या आजूबाजूच्या दुर्ग, किल्ले, ऐतिहासिक स्थळे यांचा शोध, संवर्धन, इतिहासाची ओळख यासाठी कार्य करते. एकत्र येण्याचे उद्दिष्ट एकच – एकमेकांशी जोडले जावे आणि गडवाट परिवार… प्रवास सह्याद्रीचा परिवार तयार झाला.
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ही एकमेव प्रेरणा ह्या परिवाराला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती आहे. छत्रपती शिवरायांच्या समाजकार्यातील विचारांचा वारसा जपण्याचा वसा ह्या परिवाराने घेतला असून प्रत्येक सदस्यामध्ये सामाजिक बांधिलकी वाढवणे.
गडवाट प्रवास सह्याद्रीचा ही एक सरकारी नोंदणीकृत संस्था आहे. गडवाट संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात तसेच कार्यरत आहे. ऐतिहासिक दिनविशेष विविध उपक्रमातून साजरे करणे हे गडवाटचे वैशिष्ट्य आहे.
गडवाट संस्थेची उद्दिष्टे
शाळा-कॉलेजच्या जीवनातून बाहेर पडल्यावर ऐतिहासिक दिनविशेषांचा आणि आपला संबंध तुटत जातो. जेणे करून पुढे नव्या पिढीला आपल्या नवसंस्कृतीशी ऐतिहासिकतेशी ही नाळ कायम जुळलेली राहावी म्हणून गडवाट मध्ये ऐतिहासिक दिनविशेष साजरे करण्याचा एक ध्यास घेतला. जिजामाता जयंती, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, हिंदुसम्राट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती, शूरवीरांच्या कथा सांगणे तसेच नवपिढीमध्ये समाजोपयोगी उपक्रमांची बीज रोवली जाऊ लागली.
संस्थेचा मूळ उद्देश एक महत्वाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्राचे शौर्य गाथेचा आणि किल्ले संवर्धन जनजागृती करणे छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार, प्रवास महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची ओळख प्रसारित करणे. शिवजयंती ही चौक-चौकात, कर्णकर्कश भोंग्यांच्या आवाजात साजरी केली जाते ही परंपराच बंद व्हावी हेच गडवाटचे.
गडवाटची ओळख
गडवाट बद्दल माहिती
गडवाट… प्रवास सह्याद्रीचा ही संस्था २०११ साली पुणे व मुंबईतील इतिहासप्रेमी तरुणांनी छत्रपती शिवराय आणि गडकिल्ल्यांवरील प्रेमातून स्थापन केली.
गडावर नेणारी वाट म्हणजेच “गडवाट”. नव्या पिढीला गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजावे, त्यांचे संवर्धन व्हावे आणि समाजात इतिहासाची जागृती व्हावी हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
आजपर्यंत संस्थेने १५०+ गडकिल्ल्यांवर अभ्यासपूर्ण गडभ्रमंती आयोजित केली आहे. या मोहिमांमध्ये अनेक इतिहासकार, दुर्गअभ्यासक आणि अनुभवी मार्गदर्शक सहभागी झाले आहेत
दुर्गसंवर्धनाची सुरुवात
२०१२ साली लोणावळ्यातील लोहगड किल्ला संवर्धनासाठी निवडण्यात आला.
गडावरील अस्ताव्यस्त तोफा सुरक्षित ठिकाणी हलविणे, स्वच्छता मोहीम, जनजागृती फलक लावणे आणि शिवजयंती साजरी करणे अशा उपक्रमांची सुरुवात याच गडावरून झाली.
यानंतर “सह्याद्री स्वच्छता मोहीम” संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आली.
अनेक गडकिल्ल्यांवर स्वच्छता, वृक्षारोपण आणि जनजागृती उपक्रम करण्यात आले.
गडवाटचा इतिहास
गडवाटची यात्रा
गडवाटची सुरुवात २०११ साली झाली, जेव्हा गडकिल्ल्यांवर इतिहास जागरूकता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गडवाटने १५०+ गडकिल्ल्यांना भेट दिली आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.
आपली टीम
गडवाटच्या सहकाऱ्यांची ओळख
सुहास पवार
सचिन पोखरकर
आबासाहेब कापसे
अभिजात दरेकर
जितेंद्र ताम्हाणे
सौरभ मोडक
सदस्य
- संतोष ठाकूर
- विशाल अढाव
- गौरव थोरात
- अविनाश लोखंडे
- सतीश कुरपड
- वैभव बागल
- अक्षय भावले
